नवजात मुलाचे हृदय किती वेळा धडधडते?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 17:28

 श्वसनाची लयबद्धता सुरुवातीस काही आठवडे अनियमित असली, तरी पुढे नियमित होते. नवजात अर्भक दर मिनिटास ४० वेळा श्वासोच्छ्‌वास करते.

हृदय व रुधिराभिसरण तंत्र
नाळ बांधल्याबरोबर परिसरीय रोध वाढतो. श्वसन क्रिया सुरू होताच फुफ्फुसातील रुधिराभिसरण वाढते व डाव्या अलिंदात (ज्यात शुद्ध रक्त येते त्या हृदयाच्या वरच्या कप्प्यात) अधिक रक्त येऊन तेथील रक्तदाब वाढतो. त्याच वेळी निम्नमहानीलेतील दाब कमी होऊन अंडाकार रंध्र (डाव्या व उजव्या अलिंदांच्या मध्ये असणाऱ्या पडद्यातील भोक) बंद होते. या तंत्रातील एकूण फेरफार पुढीलप्रमाणे असतात.

 
<अंडाकार रंध्र-जन्मानंतर लगेच कार्य बंद होते. पडद्यामधील शरीररचनात्मक बदल पूर्ण होण्यास ४ महिने लागतात आणि त्यानंतर रंध्राच्या जागी फक्त अंडाकार खाच उरते.

 रोहिणीवाहिनी-फुफ्फुस रोहिणी आणि अवरोही महारोहिणी यांना जोडणाऱ्या रक्तवाहिनीला ‘रोहिणीवाहिनी’ म्हणतात. जन्मानंतर ३ ते १२ दिवसांत तीमधून रक्त वाहणे बंद होते. शरीररचनात्मक दृष्ट्या ही वाहिनी बहुधा दोन महिन्यांत पूर्ण बंद होते. कार्य बंद न होता ती कार्यान्वित राहिल्यास जी जन्मजात विकृती होते, तिली ‘विवृत रोहिणीवाहिनी’ म्हणतात.

 
(३) नाभिवाहिन्या-जन्मानंतर थोड्याच दिवसांत बंद होतात.

 
(४) परिसरीय रुधिराभिसरण-बहुधा मंद असते व त्यामुळे पहिले काही दिवस हातास व पायास नीलवर्णता येते. हे लक्षण बहुधा थंडीच्या दिवसांत आढळते व ऑक्सिजनन्यूनतेमुळे उद्‌भवते.

 
रक्त
नाभिवाहिन्यांतील रक्तात असणाऱ्या ६०% हीमोग्लोबिनास ‘गर्भहीमोग्लोबिन’ म्हणतात. जन्मानंतर त्याचे प्रमाण कमी होत जाते व ४ महिन्यांत ९% होते. जन्मतः एकूण हीमोग्लोबिन १६ ते १७ ग्रॅ. % व लाल रक्तकोशिका प्रत्येक मिमी. रक्तात ५५ ते ६० लक्ष असतात. यांचे प्रमाण हळूहळू कमी होऊन ३ महिन्यांच्या सुमारास ४० लक्ष लाल रक्तकोशिका आणि ११ ग्रॅ.% हीमोग्लोबिन उरते. जालिका कोशिकांची संख्या पहिल्या दोन दिवशी ३% असते ती दोन आठवड्यांच्या सुमारास १% व तीन महिन्यांच्या सुमारास ०·५% होते. पहिले दोन दिवस केंद्रकयुक्त (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज असलेल्या) लाल रक्तकोशिका (नेहमी त्या केंद्रकविरहित असतात) आढळतात. मात्र त्यानंतर त्या अजिबात दिसत नाहीत. श्वेत कोशिकांची संख्या वयाच्या दुसऱ्या दिवशी वाढलेली म्हणजे प्रत्येक मिमी. रक्तात २०,००० असते व ती दोन आठवड्यांनी ११,००० वर येऊन ठेपते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असते (नेहमीच्या ८० ते १२० मिगॅ.% ऐवजी फक्त ४० मिग्रॅ.%).

 

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info